Posts

Showing posts from March, 2023

तुकडोजी महाराज भजन // प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ?

  प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ।।धृ0।। कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती । कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ।।१।। कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे । तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ।।२।। कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी । न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ?।।३।। कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला । सुखास्तव झूरती सारे, कळेना मार्ग कोणासी ।।४।। म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद‌ मौनावे । दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी?।।५।।

संत तुकाराम

Image
  संत तुकाराम - संत तुकाराम हे सत्तराच्या शतकातील महाराष्ट्रातील एक वारकरी संत व कवी होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला.  संत तुकाराम यांच्या वडिलांचे नावा बोल्होबा व आईचे नाव कनकाई असे होते. त्यांच्या मोठ्यां भावाचे नाव सावजी व लहान भावाचे नाव कान्होबा असे होते.  संत तुकाराम हे १७-१८ वर्षाचे असतानाच त्यांचे आईवडील निधन पावले व मोठा भाऊ तीर्थाटनाला निघून गेला त्यामुळे  घरची सर्व जबाबदारी ही  संत तुकारामांच्या अंगावरच होती. त्याचवेळी त्यांना भयंकर अश्या दुष्काळाला ही सामोरे जावे लागले. त्याच दुष्काळात त्यांचा मुलगा संतू हा देखील मरण पावला. त्यांच्या पत्नीचे नाव  जिजाई ( आवली )  होते.  " पंढरपूरचा विठोबा " हे  संत तुकारामनाचे आराध्या दैवत होते  त्यामुळे इतक्या वाईट परिस्थितीतही त्यांनी विठ्ठल्लाची भक्ती कायम ठेवली. संत तुकारामांनी त्या वेळी अनेक अभंग केले व त्यांनी केलेले हे अभंग त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे हा कागदावर उतरवून घेण्याचे काम करीत असे.  संत बहिणाबाई  या संत तुकारामच्या शिष्या होत्या.  संत तुकारामांनी संत ...

संत ज्ञानेश्वर !!

Image
देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात.  संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे.   संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल. संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ. स. १२७५ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगाव या गावी झाला होता. भावार्थदीपिका किंवा ज्ञानेश्वरी (१८ अध्याय, ओवी ९ हजार) १२९० साली नेवासे सच्चिदानंद यांच्याकडून लिहून घेतली. संत ज्ञानेश्वरांच्या ग्रंथसंपदेत अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, अभंगाची गाथा इत्यादींची भर पडली. इ. स. १२९६ मध्ये संत ज्ञानेश्वर यांनी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली.